Powered By Blogger

Friday, 18 December 2020

भाग 3 : व्यक्तीस्वातंत्र्य, सामाजिक बंधने आणि मैत्री, प्रेम

🌷 ती : hi
🌱 तो : बोल, काय म्हणतेस ? आपण दोन दिवस खूपच बोललो ना.
🌷 ती : होय रे. इतकं सविस्तर सोशल मीडियावर बोलणं म्हणजे खूपच झालं. 
🌱 तो : होय. विषयच तसा मुक्तसंवादाचा आहे ना.
🌷 ती :  पण मला हे समजत नाही की इतके मुक्त संबंध ठेवायचे असतील तर लग्नाचा देखावा तरी कशाला? निव्वळ औपचारिकता म्हणून?
🌱 तो :  हे तुझे म्हणणे मला शंभर टक्के मान्य आहे. अनेकांची इच्छा असूनही सामाजिक बंधने म्हणून लोक लग्न करतात. काही जण धाडसाने आज ही लिव्ह इनमध्ये रहातात. तुम्ही कितीही क्रांतिकारक असला तरी हजारोवर्षांची संस्था एकट्याला मोडता येत नसते आणि सर्वांचा विरोध पत्करून एकानेच किल्ला लढविण्यासाठी त्याला आयुष्यही पुरणार नाही.
🌷 ती : तू लग्न का केलंस? Live in चा पर्याय का स्वीकारला नाही?
🌱 तो : होय. मी live in चा पर्याय निवडला होता. पण मला जातीबाह्य लग्न करून दोन जातीच्या व्यक्ती एकत्र नांदू शकतात, हा आजच्या परिस्थितीत संदेश द्यायचा होता. मी त्याला अग्रक्रम दिला. केवळ आणि केवळ या उद्देशाने मी लग्न केले.
🌷 ती : तू मानत नाहीस ना विवाह संस्था? मग याच संस्थेला शरण का गेलास? त्यासाठी लग्नाच्या औपचारिकतेची गरज नव्हती. लग्न न करताही ते साध्य करता आलं असतं.
🌱 तो : शरण नाही, त्या संस्थेचे फक्त नाव वापरले
आणि मी या समाजाचा भाग आहे. इच्छा नसताना काही नियम पाळले जातात.  नवीन रचना मी एकटा नाही ना करू शकत. पण प्रयत्न करतो आहे.  
🌷 ती : हेच ते. आपण समाजाचा एक भाग आहोत म्हणून सामाजिक नियम आपल्यालाही लागू होतात. त्यात जोडीदाराशी एकनिष्ठ राहणं हाही नियम आहे आणि ते स्त्री पुरुष सगळ्यांनाच लागू आहे. 
🌱 तो : एकनिष्ठतेबद्दल आपण बोललो आहोत. आजच्या कुटुंब, विवाह संस्थेतील जेजे तोडणे, झुगारने शक्य आहे, ते झुगारावे, तोडावे. तिच्यात राहूनच त्या व्यवस्थेला आतून शक्य तितके धक्के दिले पाहिजेत. 
🌹 ती : लग्न सुद्धा स्वातंत्र्याला बाधक आहे, कारण शेवटी तेही एक सामाजिक बंधन आहे.
🌱 तो : होय की. 
🌷 ती : Exactly हेच म्हणायचंय मला. सामाजिक नियम मान्य असतील तरच लग्न करा, अन्यथा करू नका. तुमच्यावर कोणीही जबरदस्ती करत नाही. पण आयुष्याचा जोडीदार म्हणून कुणाला स्वीकारलं आहे, तर तिच्याशी प्रामाणिक रहा, पारदर्शक रहा. खरं प्रेम असेल, तिथं विश्वास आपोआप येतो. तिथं कसलीही लपवाछपवी करायची गरजच पडत नाही.
🌱 तो : यातील अनेक वाक्य एकमेकांशी परस्पर विसंगत आहेत.
1) सामाजिक नियम कुणी ठरवले ? जसे सामाजिक नियम पळायचे असतात, तसे ते मान्य नसतील तर तोडायचेही असतात. मात्र सामजिक नियम मान्य नसतील तर समाजात राहू नये, असे बोलणे अयोग्य ठरेल. 
2) कुटुंबाचे, विवाहाचे नियम कुणी ठरवले. 100 वर्षांपूर्वी होते, ते आज नियम नाहीत. मग ते कुणी आणि का बदलले. मग आज कुणी बदलत असेल तर त्यात गैर काही नाही.
3) लग्न नव्हे तर प्रत्येक नात्याची कमिटमेंट असते. संसार म्हणून जबाबदारी आणि साथीदाराचे समाधान हे कुटुंब, संसार याची कमिटमेंट आहे, असे मी मानतो. या पलीकडे कोण काय करते, हा व्यक्ती स्वातंत्र्य भाग आहे. ते स्वातंत्र्य घेतले म्हणजे कमिटमेंट नाही, असे म्हणणे हे म्हणणे गैर आहे.
पण कुणी कौटुंबिक जबाबदारी पाळली नाही, साथीदारचे समाधान केले नाही आणि बाहेर प्रेम मैत्री शोधली, तर अशा व्यक्तीची संसारात कमिटमेंट आहे असे कुणी म्हणत असेल तर ते हास्यास्पद आहे. आणि आज असंख्य लोक असेच वागतात आणि यालाच कमिटमेंट म्हटले जाते. त्यामुळे संसार हे शोषनाचे मूळ बनले आहे.
4) खरं प्रेम आणि खोटं प्रेम असे काहीही नसते. प्रेम हे प्रेम असते. बाकी कल्पनाविलास आहे. 
5) विश्वास, एकनिष्ठता, सुचिता, प्रामाणिकपणा हे शब्द संसारात बंधन म्हणून वापरले जातात.
🌷 ती : आपल्याला कुटुंब, विवाह संस्था मान्य नसतानाही विशिष्ट सामाजिक नियमांचा स्वीकार करायला लागणे, हे आपण हतबल आहोत किंवा समाज वरचढ आहे, हे दर्शवते. समाज बदलण्याची ताकद आपल्यात आहे ना? मग का करावेत मनाविरुद्ध असे नियम मान्य? का जावं अशा नियमांना शरण? मला एवढंच कळतं, जे नियम आपल्याला मान्य नाहीत, ते बिनधास्त उडवून लावावेत. केवळ समाजाचा एक भाग म्हणून त्यांचा आश्रय घेऊ नये.
🌱 तो : अनेकांनी पूर्वीपासून आणि आजही या विवाह, कुटुंब व्यवस्थेचे जाचक नियम लावलेच की धुडकावून. आंतरधर्मीय विवाह हा विवाह संस्थेचा नियम नाही. बालसंगोपन, स्त्रीला घर कामात मदत हा विवाह संस्थेचा नियम नाही. हे नियम मोडले की अनेकांनी. विवाह संस्थेचे सर्व नियम एक व्यक्ती नाही मोडू शकत. एकाने नियम मोडणे हेही क्रांतीकारी असते. मुलींनी शिकू नये, याबाबत ही आता तू प्रतिवाद करते तसे तेव्हा केले जायचे. आपल्या व्यवस्थेत तर मुलींनी शिकणे म्हणजे पाप, धर्म बुडाला, स्त्री बिथरली असे समजले जायचे. महात्मा फुलेही सर्व नियम नाही नाकारू शकले, पण स्त्री शिकली पाहिजे. हा नियम त्यांनी तोडला. एक नियम मोडला तरी खूप मोठे परिवर्तन घडले. समाजाचे सर्व चुकीचे नियम, प्रथा एका झटक्यात मोडण्याची अपेक्षा ठेवणे हे बाळबोध आहे आणि मोडायचे तर सर्व नियम मोडा नाही तर मग आहे ते सर्व स्वीकारा, हे तर अतिबालिश झाले. कोणतेही परिवर्तन टप्प्याटप्य्याने येते हे लक्षात घेतले पाहिजे.
🌷 ती : तुझे विचार चूक आहेस, असं मी म्हणत नाही. पण एखादी विचारधारा स्वीकारताय तर पूर्णपणे स्वीकारा ना. आपल्या सोयीनुसार हे अर्ध, ते अर्ध असं नको.
🌱 तो : व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून पूर्णतः हेच स्वीकार अथवा तेच स्वीकारा, असे म्हणायला तसा काही अर्थ नाही. तिथे हवे ते स्वीकारले जाते. पण तरी आपण या मुद्द्याकडे कायद्याच्या नजरेतून पाहू. आपण कायद्याच्या राज्यात रहातो. येथे विवाहबाह्य संबंध अमान्य नाही. त्यामुळे विवाहबाह्य संबंध ठेवू नयेत, या विवाह संस्थेच्या अलिखित नियमाला अर्थ उरत नाही. आणि हेच करा किंवा तेच करा, यालाही अर्थ नाही. 
🌷 ती : विवाहबाह्य संबंध कायद्याला अमान्य आहेत.
तो : 150 वर्षे जुने असलेले भारतीय दंड विधान संहितेतील कलम 497 सर्वोच्च न्यायालयाने का रद्द केले ? आणि त्याने काय स्वतंत्र मिळाले, हे नक्की वाच. दोन वर्षपूर्वीच विवाहबाह्य संबध खुले केले. तेही मोदी सरकारच्या काळात. या कलमांतर्गत पूर्वी विवाहबाह्य संबध असतील तर त्या स्त्रीचा नवरा दुसऱ्या पुरुषवर केस करू शकायचा. पाह किती बोगस कलम होते. एखाद्या स्त्रीला संबंध हवे असतील, तिने ठेवले, तिला मान्य आहेत संबंध आणि केस कोण करणार तर तिचा नवरा. आता पतिपत्नी विवाहबाह्य संबध ठेवू शकतात. नवरा दुसऱ्या पुरुषावर केस करू शकत नाही. फसवणूक झाली तर एकमेकांवर दोघेच केस करू शकतात,
हा नियम तसा सगळीकडे आहे. तो इथेही लागू होतो.
ती :  अर्थात हे ज्याचं त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. कुणी कसं वागावं, हे दुसऱ्यांनी कसं ठरवायचं ? मनावर दडपण येणार नाही, अशा पद्धतीने वागावं बस.
🌱 तो : स्वातंत्र्य मी मानतो, पण स्वराचार मानत नाही.
मी जे सांगतो आहे तसे स्वतंत्र येईलच,  पण अजून खूप शतके जावी लागतील.
🌷 ती :  तुझं म्हणणं बरोबर असेलही. पण मी एवढंच म्हणेन की, आपला कायदेशीर जोडीदार सोडून इतर कुणाशी संबंध ठेवण्यास आपल्याला काही नैतिक अडचण वाटत नसेल, आपण कम्फर्टेबल असू तर खुशाल ठेवावेत संबंध. पण आपण काही चुकीचं करतोय, आपल्या जोडीदाराशी cheating करतोय, या भावनेनं आपल्याला अपराधी वाटायला नको.
🌱 तो : अत्यन्त बरोबर आणि या व्यतिरिक्त वागण्यात समाधान देखील नाही. आपण दोघे या एकाच मतावर आलो का फायनली ?
🌷 ती : असू दे की मतभेद. मित्र आहोत म्हणून प्रत्येक गोष्टीवर एकमत असलंच पाहिजे असं कुठं आहे?
🌱 तो : मला मतभेद असण्यात काहीही अडचण नाही.
मदभेद कुठवर कमी झाले, यासाठी मी विचारले
आणि तुझे ते समारोपाचे वाक्य आणि मी कालपासून जे बोलतोय, ते एकच आहे. त्यामुळे मी मतभेद कमी झालेत असे समजतो.
🌷 ती : असू नये एकमत. रंगत येते छान.
🌱 तो : आपण दोघे या मतावर आलो का फायनली. 
🌷 ती : असं म्हणू शकतो.!!
तो : खूप वर्षांनी मी बोललो या विषयावर बघ
🌷 ती : बरं वाटलं असेल नं?
🌱 तो : जगण्यात, मनात विचार तर आहेच
पण बोलल्यावर बरे वाटले
🌷 ती : All credit goes to me
🌱 तो : होय. चल बाय
🌹 ती : बाय.
#समाप्त

(टीप : तो आणि ती कोण हे शोधण्यापेक्षा या संवादातील मुद्दे शोधून त्यावर विचार करूया !)

© विशाल विमल
--------------------------

No comments:

Post a Comment